आज अचानक आभाळ भरून आले
विजा कडाडल्या, वा़-याचे थैमान सुरू झाले
मनात विचार आला आज याच्या अंगात काय संचारले?
तसा काही तो सांगून यायचाच नाही
पण तो इतका धसमुसळा कधीच न्हवता
मनात विचार आला आज काही बिनसले का याचे?
झाडाझुडूपांनी शरणागती पत्करली होती
ढगांची त्रेधातिरपीट उडाली होती
मनात विचार आला हे काही तरी वेगळेच आहे?
चहूकडे अंधारून आलेला कुट्ट काळोख
आता बरसेल असे वाटले… पण नाहीच…
मनात विचार आला आपणच जाऊन त्याला समजवावे
मी बाहेर पडलो, त्याच्याकडे पाहीले…
नजरेतूनच व्यक्त झाली त्याची अगतिकता…
मी काहीही न बोलता परतलो, त्याच्या कोरडेपणाने चिंब होऊन
Tuesday, June 30, 2009
Saturday, June 6, 2009
नाळ जोडलेली आहे तो पर्यंत ...
नाळ जोडली जाणे… अजून पर्यंत हा फक्त एक वाक्प्रचार म्हणून माहीत होता… पण त्याच्या मागे किती गहन अर्थ आहे ते आता समजले. कदाचित “समजले” ही अतिशयोक्ती होईल… समजू लागला आहे असे म्हणता येईल फार तर…
बाळ जन्माला येणे ही प्रक्रियाच वेड लावणारी आहे. एक पेशी… त्याचे विभाजन होऊन दोन पेशी… असे करता करता पेशींचा समुह.. त्या समुहातून मेंदू आणि हृदय तयार होणे... कन्सेप्शन पासून तिसऱ्या आठवड्यात हृदयाची धडधड सोनोग्राफीच्या पटलावर अनुभवणे हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय क्षण होता. नकळत माझा हात माझ्या छातीवर गेला. माझाच अंश… माझ्याच हृदयाची धडधड मला समोर पटलावर दिसत होती… जाणवत होती… सगळ्या संवेदना बधीर झाल्या होत्या… माझ्या हृदयातील धडधड आणि पटलावरील बाळाच्या हृदयाची धडधड याच्या पलिकडे काहीच जाणवत न्हवते… सुप्रदाच्या हातावरच्या घट्ट झालेल्या पकडीने मी भानावर आलो.
या आधी ही सगळी प्रक्रिया माहीत होती… पण ती माहीत असणे आणि ती अनुभवणे, ती अनुभूती जगणे… यात जमिन-अस्मानचा फरक होता. ही अनुभूतीच हृदयी मातृत्व जागे करीत असावी… स्त्री-पुरूष असा लिंगभेद न करता!! ह्याच अनुभूतीने मी “आई” वा “मातृत्व” ह्या संकल्पेनेचा विचार करू लागलो.
आणि यातूनच नाळ जोडली जाणे याचा अर्थ समजू लागला…
गर्भात असताना आई आणि बाळ यांना जोडणारा दुवा… याच नाळेतून आईच्या शरिरातील पोषक तत्वे बाळा पर्यंत पोह्चविली जातात… प्रसंगी तिच्या हाडांतून कॅल्शियम घेउन बाळाचे पोषण केले जाते… थोडक्यात काय तर आईच्या रक्तावर एक पिंड पोसला जातो… नऊ महीने नऊ दिवस… हा पिंड पोसण्याचे काम ह्या नाळेवर अवलंबून असते.
हा अर्थ उमजत असतानाच जाणिव झाली की माझा पिंडही एका आईच्या रक्तावर पोसला गेला आहे. मी तिच्याच शरिराचा एक भाग होतो. गर्भधारणे पासून अगदी वर्षा-दीड-वर्षाचा होई पर्यंत हा पिंड तिच्याच शरिरातील सत्व घेउन स्वतःचे पोषण करीत होता. ही जाणीव मला माझ्या देहाची, माझ्या पिंडाची नव्याने ओळख करून देत होता.
आणि मनात कुठेतरी…
“बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात
बीजा हवी निगराणी, हवी मायेची सावली
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात”
ह्या गाण्याच्या ओळींचा अर्थ उलगडत होता. बीज, ओली माती, निगराणी, मायेची सावली, लख्ख निर्मळ प्रकाश, कष्टाचा पाझर, अंधारल्या रातीची चंद्रकिरणं ह्या सगळ्या गोष्टींचे संर्दभ जुळुन येत होते.
“आई” ने आजारपणात जागविलेल्या रात्री, परिक्षेच्या वेळी थर्मासमधे भरून ठेवलेला चहा, न सांगता खर्च केलेल्या चार आण्यांसाठी केलेली शिक्षा, खोटेपणा बद्दल धरलेला अबोला, वाढदिवसाला केलेले औक्षण, परिस्थिती नसताना भरलेले पिकनिकचे पैसे... असे अनेक संर्दभ चलचित्रपटासारखे भरभर डोळ्यासमोरून जाऊ लागतात… नुसता पिंडच नाही तर हे व्यक्तित्व देखील तिने पोसले आहे याची जाणीव होते…
आता “आई” ही संकल्पना अवघे अस्तित्व व्यापून टाकते…
अशा या “आई” / “मातृत्वाच्या” संकल्पनेशी आपण ज्या माध्यमाने जोडलेले असतो ते माध्यम म्हणजे “नाळ”… आणि म्हणूनच जो पर्यंत नाळ जोडलेली आहे तो पर्यंत आई हा आपल्या अस्तित्वाचाच एक भाग असते.
बाळ जन्माला येणे ही प्रक्रियाच वेड लावणारी आहे. एक पेशी… त्याचे विभाजन होऊन दोन पेशी… असे करता करता पेशींचा समुह.. त्या समुहातून मेंदू आणि हृदय तयार होणे... कन्सेप्शन पासून तिसऱ्या आठवड्यात हृदयाची धडधड सोनोग्राफीच्या पटलावर अनुभवणे हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय क्षण होता. नकळत माझा हात माझ्या छातीवर गेला. माझाच अंश… माझ्याच हृदयाची धडधड मला समोर पटलावर दिसत होती… जाणवत होती… सगळ्या संवेदना बधीर झाल्या होत्या… माझ्या हृदयातील धडधड आणि पटलावरील बाळाच्या हृदयाची धडधड याच्या पलिकडे काहीच जाणवत न्हवते… सुप्रदाच्या हातावरच्या घट्ट झालेल्या पकडीने मी भानावर आलो.
या आधी ही सगळी प्रक्रिया माहीत होती… पण ती माहीत असणे आणि ती अनुभवणे, ती अनुभूती जगणे… यात जमिन-अस्मानचा फरक होता. ही अनुभूतीच हृदयी मातृत्व जागे करीत असावी… स्त्री-पुरूष असा लिंगभेद न करता!! ह्याच अनुभूतीने मी “आई” वा “मातृत्व” ह्या संकल्पेनेचा विचार करू लागलो.
आणि यातूनच नाळ जोडली जाणे याचा अर्थ समजू लागला…
गर्भात असताना आई आणि बाळ यांना जोडणारा दुवा… याच नाळेतून आईच्या शरिरातील पोषक तत्वे बाळा पर्यंत पोह्चविली जातात… प्रसंगी तिच्या हाडांतून कॅल्शियम घेउन बाळाचे पोषण केले जाते… थोडक्यात काय तर आईच्या रक्तावर एक पिंड पोसला जातो… नऊ महीने नऊ दिवस… हा पिंड पोसण्याचे काम ह्या नाळेवर अवलंबून असते.
हा अर्थ उमजत असतानाच जाणिव झाली की माझा पिंडही एका आईच्या रक्तावर पोसला गेला आहे. मी तिच्याच शरिराचा एक भाग होतो. गर्भधारणे पासून अगदी वर्षा-दीड-वर्षाचा होई पर्यंत हा पिंड तिच्याच शरिरातील सत्व घेउन स्वतःचे पोषण करीत होता. ही जाणीव मला माझ्या देहाची, माझ्या पिंडाची नव्याने ओळख करून देत होता.
आणि मनात कुठेतरी…
“बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात
बीजा हवी निगराणी, हवी मायेची सावली
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात”
ह्या गाण्याच्या ओळींचा अर्थ उलगडत होता. बीज, ओली माती, निगराणी, मायेची सावली, लख्ख निर्मळ प्रकाश, कष्टाचा पाझर, अंधारल्या रातीची चंद्रकिरणं ह्या सगळ्या गोष्टींचे संर्दभ जुळुन येत होते.
“आई” ने आजारपणात जागविलेल्या रात्री, परिक्षेच्या वेळी थर्मासमधे भरून ठेवलेला चहा, न सांगता खर्च केलेल्या चार आण्यांसाठी केलेली शिक्षा, खोटेपणा बद्दल धरलेला अबोला, वाढदिवसाला केलेले औक्षण, परिस्थिती नसताना भरलेले पिकनिकचे पैसे... असे अनेक संर्दभ चलचित्रपटासारखे भरभर डोळ्यासमोरून जाऊ लागतात… नुसता पिंडच नाही तर हे व्यक्तित्व देखील तिने पोसले आहे याची जाणीव होते…
आता “आई” ही संकल्पना अवघे अस्तित्व व्यापून टाकते…
अशा या “आई” / “मातृत्वाच्या” संकल्पनेशी आपण ज्या माध्यमाने जोडलेले असतो ते माध्यम म्हणजे “नाळ”… आणि म्हणूनच जो पर्यंत नाळ जोडलेली आहे तो पर्यंत आई हा आपल्या अस्तित्वाचाच एक भाग असते.
बोलावणे आल्या शिवाय नाही!!
सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना बरेच चांगले वाईट अनुभव येतात. मलाही आले… कधी आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद खूप उत्साहित करायचा तर कधी कधी लोकांचा अनुत्साह बघून खूप वाईट वाटायचे… पण नंतर या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडल्या. कधी कधी तर “स्थितप्रज्ञ” अवस्थेला पोहचल्याचा भास व्हायचा. म्हणजे कार्यक्रमाला लोक आले तरी आनंद नाही… नाही आले तरी खेद नाही… पण ही “स्थितप्रज्ञ अवस्था” तात्पुरती असायची. परत पुढचा कार्यक्रम आला की पुन्हा सर्क्युलर पाठवा, सभासदांच्या प्रतिसादाची वाट पाहा… आला तर उत्तमच.. नाही आला तर फोन उचलायचा… अड्रेस बुक मधून नंबर शोधायचे आणि ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांना फोन करायचे… जोडीला सौ ना त्यांचा फोन चेक करायला सांगायचा… मग तिनेही फोन करायचे… आणि बरेचदा असे व्हायचे की फोन केल्या नंतर बरेच लोक होकार द्यायचे… असे होकार मिळाल्यानंतर आम्ही एकमेकांकडे बघून म्हणायचो… “…ह्म्म बोलावणे आल्या शिवाय नाही!!”
मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना हा अनुभव आला असेलच आणि हे असे अनुभव आल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की लोक असे का वागतात? म्हणजे असे पाहा की घरी काही तरी समारंभ असतो… घाईघाईने सगळ्यांना पत्रिका पाठविल्या जातात… आणि त्यात कुठल्यातरी मावशीच्या सासूबाईंना फोन करून ’अगत्याचे बोलावणे’ राहून जाते। समारंभ संपल्यावर आई मावशीला सासूबाईंच्या न येण्याबद्दल विचारते… मावशी उत्तरते, “अग तू नुसती पत्रिका पाठवलीस॥ फोन करून या असं कुठे म्हणालीस…” हे ऐकल्यावर माझ्या मनात येते… अहो मग पत्रिका काय द्रोण करून चणे-कुरमुरे खायला पाठविली होती?
तर अशी “मान्यवर संस्थानिक” मंडळी आपल्याला सर्वत्र आढळतात. मुलांच्या स्पर्धा आयोजित कराव्या… सर्क्युलर पाठवावे… “जेंटल रिमाइंडर्स” पाठवावे… आणि तरीही स्पर्धेच्या दोन दिवसाआधी पर्यंत एकही एंट्री येऊ नये… मग कार्यकर्त्यांनी घरचे कार्य असल्याप्रमाणे फोन करून पर्सनल आमंत्रण करावी… आणि मग असे आमंत्रण आले की स्वतःच्या आणि मैत्रिणीच्या मुलांनाही घेऊन हजर व्हावे.
असे प्रसंग झाले की सुरवातीला खूप राग यायचा… पण नंतर लोकांशी बोलल्यावर असे लक्षात आले की दरवेळी ही मंडळी काही फोनची किंवा आमंत्रणाची वाट पाहत असतात असे नाही। त्यांच्या न येण्याची अनेक कारणे असू शकतात…
काही जाणती मंडळी नवीन सभासदांना वाव मिळावा म्हणून मागे राहतात। त्यांचा हा उदात्त हेतू त्यांच्याशी बोलल्याशिवाय लक्षात येत नाही।
एखादा आठवडा महिन्याभराचे काम घेऊन येतो आणि आपण आतुरतेने विकेंडची वाट पाहत असतो. अशा विकेंडला आंबलेलं अंग आणि मन रिलॅक्स करावं असं वाटण साहजिक आहे. अशा दिवशी कुठलेही आमंत्रण नकोसे वाटते… आणि “तू नाही तर मी पण नाही” असं म्हणत जोडीदारानेही ते टाळावे असे प्रसंगही काही नवीन नाहीत. अशा वेळी येणारं आग्रहाचं बोलावणं मनाला तरतरी देऊन जातं.
कधी कधी एकाच दिवशी दोन कार्यक्रमांची निमंत्रण येतात आणि “… इक तरफ उसका घर, इक तरफ मैकदा” अशी अवस्था होते… अशात एखादा फोन कॉल आपला निर्णय घेण्याचे काम सोपे करून जातो। (दुसराही आला तर पंचाईत होते!)
काही जणांची आधीच्या एखाद्या वाईट अनुभवानंतर मने दुखावलेली असतात (ज्याच्याशी आता काम करणाऱ्य़ांशी काहीही संबंध नसतो). अशावेळी एखादा फोन ही मने सांधण्याचे काम करतो.
तर थोडक्यात काय मंडळी… आपण हवे आहोत… आपल्याला कोणीतरी बोलावते आहे, आपल्या येण्या वा न येण्याची दखल घेतली जात आहे ही भावनाच मनाला सुखावून जाणारी असते।
आणि मंडळी आपणही अशा सहज मानवी भावनांना अपवाद नसतो। अनेकदा कळत-नकळत आपणही “मान्यवर संस्थानिकांसारखे” वागलेले असतो. आठवून पाहा… असे कितीतरी प्रसंग आठवतील जेव्हा एखाद्या आलेल्या आमंत्रणाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि फोन यायची वाट पाहतो. ऑफिसमध्ये आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमचे सोल्युशन माहीत असते पण कोणीतरी आपल्याला विचारल्या शिवाय आपण सांगत नाही. गाणं म्हणता येत असतं पण कोणी आपल्याला आवर्जून आग्रह केल्याखेरिज आपण म्हणत नाही. थोडक्यात काय की बरेचदा आपल्याला भाव मिळाल्याशिवाय आपली कळी खुलत नाही… आपणही थोडेसे का होईना पण संस्थानिक असतो.
मंडळी हे सगळे वैयक्तिक आयुष्यात ठीक असते… पण सार्वजनिक आयुष्यात आपण थोडेसे अधिक “सुजाण” असायला नको का? कारण सार्वजनिक आयुष्यात कार्यक्रम आयोजित करणारी मंडळी किंवा एखादा उपक्रम चालविणारी मंडळी ही तुम्हा-आम्हा सारखी नोकरीधंदा सांभाळून हे उपद्व्याप करीत असतात. त्यांनाही बरीच कामं असतात… अशावेळी त्यांच्या हाकेला लगेच ओ मिळाली तर त्यांचाही हुरूप कित्येक पटीने वाढेल… कार्यक्रमांचे आयोजन कितीतरी चांगल्या रीतीने करता येईल… आणि ह्या सगळ्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे…. नाही का?
तर काय मग पुढच्या वेळी बोलावण्याची वाट पाहणार की…
मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना हा अनुभव आला असेलच आणि हे असे अनुभव आल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की लोक असे का वागतात? म्हणजे असे पाहा की घरी काही तरी समारंभ असतो… घाईघाईने सगळ्यांना पत्रिका पाठविल्या जातात… आणि त्यात कुठल्यातरी मावशीच्या सासूबाईंना फोन करून ’अगत्याचे बोलावणे’ राहून जाते। समारंभ संपल्यावर आई मावशीला सासूबाईंच्या न येण्याबद्दल विचारते… मावशी उत्तरते, “अग तू नुसती पत्रिका पाठवलीस॥ फोन करून या असं कुठे म्हणालीस…” हे ऐकल्यावर माझ्या मनात येते… अहो मग पत्रिका काय द्रोण करून चणे-कुरमुरे खायला पाठविली होती?
तर अशी “मान्यवर संस्थानिक” मंडळी आपल्याला सर्वत्र आढळतात. मुलांच्या स्पर्धा आयोजित कराव्या… सर्क्युलर पाठवावे… “जेंटल रिमाइंडर्स” पाठवावे… आणि तरीही स्पर्धेच्या दोन दिवसाआधी पर्यंत एकही एंट्री येऊ नये… मग कार्यकर्त्यांनी घरचे कार्य असल्याप्रमाणे फोन करून पर्सनल आमंत्रण करावी… आणि मग असे आमंत्रण आले की स्वतःच्या आणि मैत्रिणीच्या मुलांनाही घेऊन हजर व्हावे.
असे प्रसंग झाले की सुरवातीला खूप राग यायचा… पण नंतर लोकांशी बोलल्यावर असे लक्षात आले की दरवेळी ही मंडळी काही फोनची किंवा आमंत्रणाची वाट पाहत असतात असे नाही। त्यांच्या न येण्याची अनेक कारणे असू शकतात…
काही जाणती मंडळी नवीन सभासदांना वाव मिळावा म्हणून मागे राहतात। त्यांचा हा उदात्त हेतू त्यांच्याशी बोलल्याशिवाय लक्षात येत नाही।
एखादा आठवडा महिन्याभराचे काम घेऊन येतो आणि आपण आतुरतेने विकेंडची वाट पाहत असतो. अशा विकेंडला आंबलेलं अंग आणि मन रिलॅक्स करावं असं वाटण साहजिक आहे. अशा दिवशी कुठलेही आमंत्रण नकोसे वाटते… आणि “तू नाही तर मी पण नाही” असं म्हणत जोडीदारानेही ते टाळावे असे प्रसंगही काही नवीन नाहीत. अशा वेळी येणारं आग्रहाचं बोलावणं मनाला तरतरी देऊन जातं.
कधी कधी एकाच दिवशी दोन कार्यक्रमांची निमंत्रण येतात आणि “… इक तरफ उसका घर, इक तरफ मैकदा” अशी अवस्था होते… अशात एखादा फोन कॉल आपला निर्णय घेण्याचे काम सोपे करून जातो। (दुसराही आला तर पंचाईत होते!)
काही जणांची आधीच्या एखाद्या वाईट अनुभवानंतर मने दुखावलेली असतात (ज्याच्याशी आता काम करणाऱ्य़ांशी काहीही संबंध नसतो). अशावेळी एखादा फोन ही मने सांधण्याचे काम करतो.
तर थोडक्यात काय मंडळी… आपण हवे आहोत… आपल्याला कोणीतरी बोलावते आहे, आपल्या येण्या वा न येण्याची दखल घेतली जात आहे ही भावनाच मनाला सुखावून जाणारी असते।
आणि मंडळी आपणही अशा सहज मानवी भावनांना अपवाद नसतो। अनेकदा कळत-नकळत आपणही “मान्यवर संस्थानिकांसारखे” वागलेले असतो. आठवून पाहा… असे कितीतरी प्रसंग आठवतील जेव्हा एखाद्या आलेल्या आमंत्रणाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि फोन यायची वाट पाहतो. ऑफिसमध्ये आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमचे सोल्युशन माहीत असते पण कोणीतरी आपल्याला विचारल्या शिवाय आपण सांगत नाही. गाणं म्हणता येत असतं पण कोणी आपल्याला आवर्जून आग्रह केल्याखेरिज आपण म्हणत नाही. थोडक्यात काय की बरेचदा आपल्याला भाव मिळाल्याशिवाय आपली कळी खुलत नाही… आपणही थोडेसे का होईना पण संस्थानिक असतो.
मंडळी हे सगळे वैयक्तिक आयुष्यात ठीक असते… पण सार्वजनिक आयुष्यात आपण थोडेसे अधिक “सुजाण” असायला नको का? कारण सार्वजनिक आयुष्यात कार्यक्रम आयोजित करणारी मंडळी किंवा एखादा उपक्रम चालविणारी मंडळी ही तुम्हा-आम्हा सारखी नोकरीधंदा सांभाळून हे उपद्व्याप करीत असतात. त्यांनाही बरीच कामं असतात… अशावेळी त्यांच्या हाकेला लगेच ओ मिळाली तर त्यांचाही हुरूप कित्येक पटीने वाढेल… कार्यक्रमांचे आयोजन कितीतरी चांगल्या रीतीने करता येईल… आणि ह्या सगळ्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे…. नाही का?
तर काय मग पुढच्या वेळी बोलावण्याची वाट पाहणार की…
अश्वत्थामा
त्या दिवशी तो सकाळी सकाळी दिसला,
अंगभर कोड घेउन किळसवाण्या अवस्थेत फिरताना,
शरीर जर्जर झाले होते पण डोळ्यात चमक होती
अंगभर वेदना होत्या पण चेहरा शांत होता
हातात वाटी घेउन तो तेल मागत होता
भाळी भळभळणाऱ्या जखमेचा दाह शमविण्यासाठी
सकाळी सकाळी अभद्र दर्शन म्हणून
लोकांच्या कपाळी आठी चढलेली दिसत होती
लोकांच्या कुत्सित नजरा त्याला परिचयाच्या होत्या
पण तरीही तो शांत होता
मला त्याची दया येत न्हवती
पण किळसही वाटत न्हवती
तो कोण असेल? असा का फिरत असेल?
का त्याला कोणी मदत करत नसेल?
माझ्या डोक्यात विचारचक्र चालू होते
आणि इतक्यात तो दिसेनासा झाला
माझी नजर त्याला शोधू लागली
“मला शोधतो आहेस?” शेजारून प्रश्न आला
माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न त्याला न विचारताच कळले असावेत
“मी अश्वत्थामा” त्याने ओळख करून दिली
माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात
मीही इतरांसारखा किळसवाण्या नजरेने त्याच्याकडे पहातो
तो हसतो… उपरोधीत…
आता त्याच्या शांत चेहऱ्यावर वेदना जाणवते
“अरे पित्याच्या कपटाने केलेल्या वधाचा प्रतिशोध
म्हणून मी भ्रूण हत्येचे पाप केले…
त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उपेक्षित भटकतो आहे
पण आज इथे राजरोस भ्रूण हत्या होत आहेत
आता कुठे गेला तुमचा कृष्ण?
की त्या उत्तरा त्याच्या कोणी लागत नाहीत?”
अश्वत्थामा निघून गेला…
भाळी नाही तर काळजात एक भळभळणारी जखम देउन…
अंगभर कोड घेउन किळसवाण्या अवस्थेत फिरताना,
शरीर जर्जर झाले होते पण डोळ्यात चमक होती
अंगभर वेदना होत्या पण चेहरा शांत होता
हातात वाटी घेउन तो तेल मागत होता
भाळी भळभळणाऱ्या जखमेचा दाह शमविण्यासाठी
सकाळी सकाळी अभद्र दर्शन म्हणून
लोकांच्या कपाळी आठी चढलेली दिसत होती
लोकांच्या कुत्सित नजरा त्याला परिचयाच्या होत्या
पण तरीही तो शांत होता
मला त्याची दया येत न्हवती
पण किळसही वाटत न्हवती
तो कोण असेल? असा का फिरत असेल?
का त्याला कोणी मदत करत नसेल?
माझ्या डोक्यात विचारचक्र चालू होते
आणि इतक्यात तो दिसेनासा झाला
माझी नजर त्याला शोधू लागली
“मला शोधतो आहेस?” शेजारून प्रश्न आला
माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न त्याला न विचारताच कळले असावेत
“मी अश्वत्थामा” त्याने ओळख करून दिली
माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात
मीही इतरांसारखा किळसवाण्या नजरेने त्याच्याकडे पहातो
तो हसतो… उपरोधीत…
आता त्याच्या शांत चेहऱ्यावर वेदना जाणवते
“अरे पित्याच्या कपटाने केलेल्या वधाचा प्रतिशोध
म्हणून मी भ्रूण हत्येचे पाप केले…
त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उपेक्षित भटकतो आहे
पण आज इथे राजरोस भ्रूण हत्या होत आहेत
आता कुठे गेला तुमचा कृष्ण?
की त्या उत्तरा त्याच्या कोणी लागत नाहीत?”
अश्वत्थामा निघून गेला…
भाळी नाही तर काळजात एक भळभळणारी जखम देउन…
आपण असे का वागतो
काल परवाची गोष्ट आहे … आम्ही म्हणजे मी आणि सौ ऋतुगंधच्या मिटींग मधे आपल्याला जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल याचा उहापोह करून बाहेर पडलो. बसस्टॉपवर येवून लिटिल इंडीयाला जाणारी बस कोणती हे पहात असतानाच काही मराठी आवाज कानावर पडले. मागे वळून पाहिले तर दोन अनोळखी चेहरे सिंगापूरी लोकांबद्दल आपापली मते व्यक्त करण्यात मश्गुल होते. “कदाचित प्रोजेक्टवर आले असतील…” माझी आणि सौ ची सांकेतिक नजरानजर …
आम्ही आम्हाला हवी ती माहिती पाहून समभाषिक मराठी बंधूंपासून काही अंतरावर उभे राहिलो. अंमळ त्याना टाळूनच … काही वेळाने आमची बस आली आणि आम्ही बसमधे चढलो. बस मधे बसल्याबसल्या डोक्यातील चक्रे फिरू लागली … आपल्यातलाच विरोधाभास जाणवू लागला … काही वेळापूर्वी मिटिंगमधे ऋतुगंधच्या माध्यमातून ऑन-लाइन जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचू पाहणारे आपण आणि आता बसस्टॉपवर दोन मराठी माणसांना टाळून उभे राहणारे आपण … आणि मग एक विचारमालिका सुरू झाली … काहीश्या वेगळ्या विचारांची … आपण असे का वागतो?
आपणही ऑन-लाइन जगात कंफर्टेबल असणा-यांच्या जगात सामील व्हायला लागलोय की काय अशी बोचरी शंका येऊ लागली. ऑन-लाइन जगात आपला मूड, आपली प्रायवसी प्रोटेक्टेड असते. मूड असेल तर बोलायचे … नसेल तर साइन आऊट … ऑन लाइन असून लोकांशी बोलायचे नसेल तर “इन-विजिबल” राहता येते. एखादी व्यक्ती डोक्याला ताप देत असेल तर तिला “ब्लॉक” करता येते … म्हणजे थोडक्यात ऑन-लाइन जगात आपण आपल्या मर्जीचे मालक असतो.
ह्या मर्जीच्या मालकीने समाधान न झाल्यास “सेकंड लाइफ” वर जाउन हवा तो “अवतार” घेता येतो… (“अवतार” घेणे हे इतके सहजशक्य असते हे भगवान विष्णूंना कळले तर त्यांना काय वाटेल?) आपल्या सारख्या इतर अवतारी लोकांना भेटता येतं … खिशात लिंडन डॉलर्स (सेकंड लाइफच्या जगातील चलन!) खेळत असतील तर जमीन-जुमला, गाडी असे सगळे काही खरेदी करता येते … आणि हे सगळं होत असताना चिरतरूण रहाता येते … आहे की नाही मज्जा!!
आता मला सांगा हे ऑन-लाइन जग इतके सुंदर असेल तर आपल्याला खर्याखुर्या जगाची गरजंच काय? उगाच घराबाहेर पडायचे, चार लोकांना भेटायचे, त्यांच्या ओळखी, त्यातून अपेक्षा, इमोशनल क्रायसिस … छे छे ह्या सगळ्या पेक्षा ते ऑन-लाइन जगंच बरे … हो की नाही? पण मित्रांनो ह्या जस्टिफिकेशन मधेच ह्या प्रश्नाचे उत्तर दडले आहे.
जेव्हा इंटरनेट नव्हते तेव्हा लोक एकमेकांना भेटत होते. त्यातून उद्भवणारे इमोशनल क्रायसिस तेंव्हाही असायचे … पण त्यावेळी लोक त्या इमोशनल क्रायसिसना सामोरे जाऊ शकत होते. आजकाल आपल्याला “एस्केप रूट” आहे म्हणून आपण त्या क्रायसिसना सामोरे न जाता “पतली गली” ने पलायन करतो. आणि हेच पलायन आपले भावनिक खच्चीकरण करत असते. जेव्हां आयुष्यात खरोखर इमोशनल क्रायसिस उद्भवतात तेंव्हा आपल्याला ते हॅंडल कसे करायचे ते माहितच नसते किंबहुना सवय उरलेली नसते. आणि ही जर अवस्था आपली असेल तर उद्याच्या इंटरनेट जनरेशनचे काय सांगावे!!
अगदी साध्यासोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या मेंदूला आपण जसे लावावे तसे वळण लागते. जर आपण भावनिकदृष्ट्या मेंदूला अलिप्त ठेवून फक्त काल्पनिक जगात रममाण व्हायला शिकविले तर ख-या जगातील संवाद, त्यातून उद्भवणारे ताण मेंदूला सहनच होणार नाहीत. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील एका संशोधनात असे आढळून आले की इंटरनेट, टेलिविजन इत्यादी गोष्टींच्या अतिवापरामुळे शालेय विद्यार्थ्यांमधे हिंसक वृत्ती वाढीला लागली आहे. कारण आई वडील नोकरी करत असल्यामुळे ही मुले शक्यतो एकटी राहतात. अशा मुलांना समूहात / समाजात कसे वावरावे हे कळत नसते.
थोडक्यात काय तर अगदी दोन पावलावर राहणार्या मित्राला आपण ऑरकुटवर का भेटतो? येतांजातां कानात बटणं घालून आजूबाजूला चालू असलेल्या जीवनसंगीताकडे दुर्लक्ष का करतो? महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला न येता एकमेकांना मेलवर / एसएमएस वर पाडव्याच्या शुभेच्छा का देतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण स्वतःला देण्याची आज गरज आहे.
आम्ही आम्हाला हवी ती माहिती पाहून समभाषिक मराठी बंधूंपासून काही अंतरावर उभे राहिलो. अंमळ त्याना टाळूनच … काही वेळाने आमची बस आली आणि आम्ही बसमधे चढलो. बस मधे बसल्याबसल्या डोक्यातील चक्रे फिरू लागली … आपल्यातलाच विरोधाभास जाणवू लागला … काही वेळापूर्वी मिटिंगमधे ऋतुगंधच्या माध्यमातून ऑन-लाइन जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचू पाहणारे आपण आणि आता बसस्टॉपवर दोन मराठी माणसांना टाळून उभे राहणारे आपण … आणि मग एक विचारमालिका सुरू झाली … काहीश्या वेगळ्या विचारांची … आपण असे का वागतो?
आपणही ऑन-लाइन जगात कंफर्टेबल असणा-यांच्या जगात सामील व्हायला लागलोय की काय अशी बोचरी शंका येऊ लागली. ऑन-लाइन जगात आपला मूड, आपली प्रायवसी प्रोटेक्टेड असते. मूड असेल तर बोलायचे … नसेल तर साइन आऊट … ऑन लाइन असून लोकांशी बोलायचे नसेल तर “इन-विजिबल” राहता येते. एखादी व्यक्ती डोक्याला ताप देत असेल तर तिला “ब्लॉक” करता येते … म्हणजे थोडक्यात ऑन-लाइन जगात आपण आपल्या मर्जीचे मालक असतो.
ह्या मर्जीच्या मालकीने समाधान न झाल्यास “सेकंड लाइफ” वर जाउन हवा तो “अवतार” घेता येतो… (“अवतार” घेणे हे इतके सहजशक्य असते हे भगवान विष्णूंना कळले तर त्यांना काय वाटेल?) आपल्या सारख्या इतर अवतारी लोकांना भेटता येतं … खिशात लिंडन डॉलर्स (सेकंड लाइफच्या जगातील चलन!) खेळत असतील तर जमीन-जुमला, गाडी असे सगळे काही खरेदी करता येते … आणि हे सगळं होत असताना चिरतरूण रहाता येते … आहे की नाही मज्जा!!
आता मला सांगा हे ऑन-लाइन जग इतके सुंदर असेल तर आपल्याला खर्याखुर्या जगाची गरजंच काय? उगाच घराबाहेर पडायचे, चार लोकांना भेटायचे, त्यांच्या ओळखी, त्यातून अपेक्षा, इमोशनल क्रायसिस … छे छे ह्या सगळ्या पेक्षा ते ऑन-लाइन जगंच बरे … हो की नाही? पण मित्रांनो ह्या जस्टिफिकेशन मधेच ह्या प्रश्नाचे उत्तर दडले आहे.
जेव्हा इंटरनेट नव्हते तेव्हा लोक एकमेकांना भेटत होते. त्यातून उद्भवणारे इमोशनल क्रायसिस तेंव्हाही असायचे … पण त्यावेळी लोक त्या इमोशनल क्रायसिसना सामोरे जाऊ शकत होते. आजकाल आपल्याला “एस्केप रूट” आहे म्हणून आपण त्या क्रायसिसना सामोरे न जाता “पतली गली” ने पलायन करतो. आणि हेच पलायन आपले भावनिक खच्चीकरण करत असते. जेव्हां आयुष्यात खरोखर इमोशनल क्रायसिस उद्भवतात तेंव्हा आपल्याला ते हॅंडल कसे करायचे ते माहितच नसते किंबहुना सवय उरलेली नसते. आणि ही जर अवस्था आपली असेल तर उद्याच्या इंटरनेट जनरेशनचे काय सांगावे!!
अगदी साध्यासोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या मेंदूला आपण जसे लावावे तसे वळण लागते. जर आपण भावनिकदृष्ट्या मेंदूला अलिप्त ठेवून फक्त काल्पनिक जगात रममाण व्हायला शिकविले तर ख-या जगातील संवाद, त्यातून उद्भवणारे ताण मेंदूला सहनच होणार नाहीत. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील एका संशोधनात असे आढळून आले की इंटरनेट, टेलिविजन इत्यादी गोष्टींच्या अतिवापरामुळे शालेय विद्यार्थ्यांमधे हिंसक वृत्ती वाढीला लागली आहे. कारण आई वडील नोकरी करत असल्यामुळे ही मुले शक्यतो एकटी राहतात. अशा मुलांना समूहात / समाजात कसे वावरावे हे कळत नसते.
थोडक्यात काय तर अगदी दोन पावलावर राहणार्या मित्राला आपण ऑरकुटवर का भेटतो? येतांजातां कानात बटणं घालून आजूबाजूला चालू असलेल्या जीवनसंगीताकडे दुर्लक्ष का करतो? महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला न येता एकमेकांना मेलवर / एसएमएस वर पाडव्याच्या शुभेच्छा का देतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण स्वतःला देण्याची आज गरज आहे.
नि:शब्द मी …
शब्दच आमुची शस्त्रे होती
गप्पांचे फड गाजवताना
शब्दांच्याच होत्या तलवारी
वाद-विवाद जुंपताना
असे आम्ही शब्दशूर
करून आमुचे शब्द म्यान
दाखल झालो मंडपी
घेऊन पांढरे निशाण
आता ‘त्या’ बोलत असतात
मी फक्त ऎकत असतो शब्द
काहीही बोललो तरी होतात वाद
म्हणून बरा मी … नि:शब्द … नि:शब्द
गप्पांचे फड गाजवताना
शब्दांच्याच होत्या तलवारी
वाद-विवाद जुंपताना
असे आम्ही शब्दशूर
करून आमुचे शब्द म्यान
दाखल झालो मंडपी
घेऊन पांढरे निशाण
आता ‘त्या’ बोलत असतात
मी फक्त ऎकत असतो शब्द
काहीही बोललो तरी होतात वाद
म्हणून बरा मी … नि:शब्द … नि:शब्द
जाणीवांचे कावळे
८ डिसेंबर २००८…
जे मेले ते सगळे हिंदू होते म्हणून नाही
तर मी हिंदू आहे म्हणून
हिंदू परंपरेनुसार आज त्या सगळ्यांची
सामुहिक दशक्रिया विधी आहे
कसला पिंड अर्पण करावा
कुठले वचन द्यावे
कोणत्या गोष्टी त्यांच्यानावे त्यागाव्या
जेणे करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल
पिंडच जर अर्पण करायचा असेल तर
त्याच्या मरणाला जे जबाबदार आहेत
त्यांच्या रक्ता-मांसाचा
पिंड मी अर्पण करू शकेन काय?
त्यांच्या अंतिम इच्छा काय होत्या माहीत नाही
पण त्यांच्या मागे जे आहेत
त्यांच्या सुरक्षिततेचे वचन
मी देऊ शकेन काय?
ज्या भ्रष्ट व्यवस्थेचा मी एक अविभाज्य भाग आहे
अशा भ्रष्ट व्यवस्थेत जगताना
जे मेले त्यांच्या नावे मी स्वतःपुरता तरी
भ्रष्टाचार सोडू शकेन काय?
माझी अगतिकता समजून
निष्पाप जीवांच्या पिंडाना
भुकेलेले कावळे शिवले
तरी माझ्या जाणीवांचे कावळे
मला बोचत राहतील
जे मेले ते सगळे हिंदू होते म्हणून नाही
तर मी हिंदू आहे म्हणून
हिंदू परंपरेनुसार आज त्या सगळ्यांची
सामुहिक दशक्रिया विधी आहे
कसला पिंड अर्पण करावा
कुठले वचन द्यावे
कोणत्या गोष्टी त्यांच्यानावे त्यागाव्या
जेणे करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल
पिंडच जर अर्पण करायचा असेल तर
त्याच्या मरणाला जे जबाबदार आहेत
त्यांच्या रक्ता-मांसाचा
पिंड मी अर्पण करू शकेन काय?
त्यांच्या अंतिम इच्छा काय होत्या माहीत नाही
पण त्यांच्या मागे जे आहेत
त्यांच्या सुरक्षिततेचे वचन
मी देऊ शकेन काय?
ज्या भ्रष्ट व्यवस्थेचा मी एक अविभाज्य भाग आहे
अशा भ्रष्ट व्यवस्थेत जगताना
जे मेले त्यांच्या नावे मी स्वतःपुरता तरी
भ्रष्टाचार सोडू शकेन काय?
माझी अगतिकता समजून
निष्पाप जीवांच्या पिंडाना
भुकेलेले कावळे शिवले
तरी माझ्या जाणीवांचे कावळे
मला बोचत राहतील
Subscribe to:
Posts (Atom)